HomeBlogराष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी उपक्रमामुळे महिलांना न्याय

राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी उपक्रमामुळे महिलांना न्याय

नवी मुंबईत 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण; विजया रहाटकर यांचा विश्वास

“नवी मुंबई : प्रतिनिधी”

नवी मुंबई, दि. 21 एप्रिल (विमाका) : महिलांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला जनसुनावणी आयोजित करण्यात आली. या जनसुनावणीत विविध प्रकारच्या एकूण 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण झाली. तसेच उर्वरित प्रकरणांवर येत्या आठ दिवसात निराकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

“राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई बेलापूर येथील सिडको भवन येथे ही जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोग अतिरिक्त सचिव राधिका चक्रवर्ती, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि तक्रारदार महिला उपस्थित होत्या.

“महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल.” – विजया रहाटकर


या जनसुनावणीसाठी 63 अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये 28 नोंदणीकृत तक्रारी आणि वॉक-इन स्वरूपातील 35 नवीन तक्रारींचा समावेश होता. त्यापैकी 28 तक्रारींची सुनावणी पूर्ण झाली असून उर्वरित प्रकरणांचे निराकरण आठ दिवसांत करण्याचे निर्देश देण्यात आले. काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यांना वेळ लागू शकतो, असेही सांगण्यात आले.

नवी मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या बैठकीत महिला तक्रारी व योजनांचा आढावा घेताना अधिकारी
नवी मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या बैठकीत कोकण विभागातील महिला तक्रारी व योजनांचा आढावा

विविध तक्रारींवर कार्यवाही

या जनसुनावणीत बलात्कार/प्रयत्न-1, लैंगिक छळ-5, मारहाण-3, घरगुती हिंसाचार-14, हुंडाबळी छळ-3, सायबर गुन्हा-1 आणि अपहरण-1 अशा विविध 28 तक्रारींवर प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे आणखी 35 महिलांनी उपस्थित राहून तक्रारी नोंदवल्या. यामध्ये विशेषतः घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये समुपदेशन आणि मध्यस्थीच्या माध्यमातून वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

[येथे संबंधित बातमी वाचा]- https://navimumbaiheadlines.com/women-issues-navi-mumbai

कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

महिलांच्या संरक्षणासाठी कायदे सक्षम असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रहाटकर यांनी नमूद केले. स्थानिक यंत्रणांनी वेळेत न्याय दिल्यास अशा विशेष उपक्रमांची गरज कमी भासेल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी उपक्रमामुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या बैठकीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण विभागाचा आढावा घेताना अधिकारी
राष्ट्रीय महिला आयोगाच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोकण विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद

कोकण विभागाचा आढावा

याच दिवशी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोकण विभागाचा सर्वंकष आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या महिलाकेंद्रित योजनांची अंमलबजावणी, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) नुसार महाराष्ट्रात महिलांविरुद्ध गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले.

महिलांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस महिलांसाठी राखून ठेवावा, तसेच ‘वन स्टॉप सेंटर’ आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

[अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा] https://divcomkonkan.gov.in/

महिलांच्या सहाय्यासाठी आयोगाची 24×7 हेल्पलाईन ‘14490’ कार्यान्वित असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular