Homeक्राईम प्रवासठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३७ जण अटक

ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३७ जण अटक

एपीएमसी मार्केटसह विविध भागांत धाडी; ३१ प्रतिष्ठाने सील, भेसळ व प्रतिबंधित पदार्थांविरोधात प्रशासनाचा इशारा

नवी मुंबई : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एपीएमसी मार्केटसह ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सलग धाडसत्र राबवून ११ लाखांहून अधिक किमतीचे आंबे आणि साडेचार लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तसेच विविध गुन्ह्यांप्रकरणी ३७ जणांना अटक करण्यात आली असून ३१ प्रतिष्ठानांना सील ठोकण्यात आले आहे.

राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० आणि ३१ मे २०२६ रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. उन्हाळ्यात आंब्यांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन काही व्यापारी फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धती वापरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक धाडी टाकून तपासणी केली.

ठाणे जिल्ह्यातील एपीएमसी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आंब्यांच्या पेट्यांची तपासणी करताना दिसत आहेत.
ठाण्यात FDA ची धडक कारवाई; एपीएमसी मार्केटमध्ये आंबा साठ्याची तपासणी, नियमभंग करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई.

ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; आंबा व्यापाऱ्यांवर बडगा

तपासणीदरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलिन सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ३,४५३ किलो आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त आंब्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये इतकी असल्याचे प्रशासनाने सांगितले.

“नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.” – अन्न व औषध प्रशासन

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारण्यास मनाई आहे. त्याऐवजी सुरक्षित इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे तपासणीत उघड झाले. जप्त आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, तपासणीत कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनाचा वापर आढळला नाही.

ठाण्यातील एका दुकानावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची तपासणी सुरू असल्याचे दृश्य.
गुटखा विक्रेत्यांविरोधात FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त.

गुटखा विक्रेत्यांविरोधातही कठोर कारवाई

दरम्यान, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मेदरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३६ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त केला.

याशिवाय, बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. परिणामी आतापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आली असून नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या ३१ प्रतिष्ठानांना सील करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित अन्नपदार्थांबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनाला तत्काळ कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

[येथे संबंधित बातमी वाचा]
नवी मुंबईतील आरोग्य आणि अन्न सुरक्षा विषयक इतर बातम्या वाचण्यासाठी: https://navimumbaiheadlines.com/category/health

[अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा]
https://divcomkonkan.gov.in/

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular